Saturday, November 20, 2010

aathavan

आठवण

रुतु बदलले तरी
शब्दं कधी बदलत नसतात
अश्रु कितीही आवरले तरी
शब्दं खुप काही बोलुन जातात

वर्तमानात जगता जगता
कधी एक क्षण असाही येतो
ईच्छा नसली तरि
भुतकाळात घेउन जातो
कितीहि गर्दित असलो तरि
एकटा करुन जातो

अशा वेळी डोळ्यातले
अश्रुही मुक होऊन जातात
अन कितीहि आवरले तरि
शब्दं आपोआप मांडले जातात

सगळं काही विसरुन
पुढे चालत राहणं
तेवढं सोप नसतं
तिची आठवण आलेला
दिवस घालवणं खुप कठीण असतं........

-->DEV<--